Social मीडिया मैत्री आणि सत्य

नेहमी असणारा तो वर्दळीचा पद रस्ता आज शांत होता झगमगीत पोशाखात जाणाऱ्या दोन तरुणांचे शब्द त्या बिहारी मुलाने ऐकले मराठी जास्त येत नसली तरी तो समजत होता•अरे यार त्याचे इंस्टा वर 1k फोल्लोवर झाले हे इंस्टा काय आपल्या बिहारी मुलाला काय माहीत शेट सांगेल तो ते काम करणे आणि रात्री 7 जनाचा स्वयंपाक करणे हेच त्यांचे काम•शेट ऑनलाइन त्याच्या आईला पैसे पाठवायचा ते आले का नाही हे आईला फोन वर विचारल्यावर ती तिकडून हो म्हणाली की ह्याला अंबानी च्या खाली अनुभव येत नसायचा• पण आज रुख रुख झाली त्याला आपल्याला काहीच माहीत नाही,दुकानात येणाऱ्या एका कॉलेज टोळक्याने त्याला थोडं थोडं सांगितले की हे सोशल मीडिया आहे तरी काय? त्या बिचार्याला मग कळले की ह्यातून पैसे येत नाही नसलेलं आभासी जग तरी कशाला जगायचे?ह्याने माझे दुःख तर कमी होणार नाही शिवाय बरोबर असलेले कोणी पण त्यावर नाही मग कशाला पडता नसत्या भानगडीत विचार करून त्याने तो काळा दुरसट कप उचलला आपल्या घामाने भिजलेल्या खांद्यावरच्या कपड्याने टेबल साफ केला•भर उन्हात पाऊस पडल्यावर कसे पाणी वाफ होते तसे त्याच्या भावना ची वाफ झाली फार व्यवहारी होता तो•


इंदुरीकरांच्या भाषेत सांगायचे झाले तर 18 ते 22 ची जनता एकमेकांना त्याचे फ्रेंड्स किती फोल्लोवेर्स किती लाइक्स किती ह्यावर एकमेकांचा रेटिंग मग किंमत त्याचे मित्रांमध्ये स्थान आणि मग तो किती कूल आहे त्याचे 2.6k लाइक्स आहेत इथपर्यंत येऊन पोहोचले आहेत विदारक सत्य आहे हे •
एक युरोपिअन ने संगीतले आहे तुम्ही तुमच्यासाठी जीवात जीव असेल तोपर्यंत साथ देणारा एक जरी दोस्त कमावला तरी सर्व जगावर राज्य करू शकता 
आता फेसबुक ला असणाऱ्या 5k मित्रांना एकच मेसेज दिला की i need money plz transfer त्या 5k मधील किती देतील हे म्हणजे गुळाचा गणपती होईल•असो आता त्यातील किती रिप्लाय देतील किती unfriend करतील हे नारळातील पाणीच होईल 😂 निघाले तर निघाले नाहीतर फक्त खोबरे राहिले•
ज्यांची बॅच 1985 ला पास झाली ती कोणतीही असेल 12 वि किंवा डिग्री असेल आज ते पण सोशल मीडिया वर आहेत त्यांची दोस्तीचे किनारे वेगळे आहेत त्यांची पण सोशल मीडिया वर ग्रुप आहेत पन ती लोकं मैत्र ची व्याख्या जरा वेगळी करत असतील कदाचित ??
ह्यातून तुमच्या कठीण कामाला येणारे लोक कादाचीत सोशल मीडिया वापरात पण नसतील किती विरोधाभास आहे
आजकाल 30 सेकंड च स्टेटस काय ठेवलाय ह्यावरून त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व ठरवणारे महाभाग पण असतील ह्या लोकांच्या डोक्यात ब्रह्मदेवाने जरी काठी हाणली तरी ह्यांची बुद्धी काय चाळणीत राहणार नाही• ह्यांची चाळणीच मुळात विकारांनी भरली आहे😊
दर दोन चार वर्षानी प्रत्येकाच्या गरजा बदलतात तश्या त्याच्या मैत्रीच्या व्याख्याही बदलतात •
आज घेतलेला निर्णय आपल्याला 2-3वर्षांनी चुकीचा वाटू शकतो कदाचित ती परिस्थिती आपली बौद्धिक मर्यादा ह्याही गोष्टी त्यावर परिणाम करत असतील•
वेळ सर्वाना असतो पण तो द्यायचा कोणाला हे जो तो आपली प्राथमिकता,सुविधा ,गरज,आणि विचार मर्यादा,कदाचित कधी परिस्तिथी ह्यावर पण ठरवत असेल•
कोणताच मनुष्य परिपूर्ण नाही असेल तर तो महात्मा होईल पण एक सामान्य जीवन जगत असताना केलेली तडजोड खूप विचारपूर्वक आणि येणाऱ्या काळाचे भान ठेवून करावी असे मला वाटते•
तुमचा आज हक्क आहे तिथे कोणी दुसरे असेल तुमचे निर्णय कदाचित मागे पाडतील किंवा कालबाध्य होतील पण ते निर्णय घेण महत्वाचे आहे•
नाहीतर तुमच्यात आणि पशु मध्ये फरक तो कोणता?
आज सोशल मीडिया वरून दोस्तीच्या व्याख्या ठरवणाऱ्या ना उद्या खरी जाणीव ही होणारच आहे प्रश्न आहे की ती किती लवकर होते आणि तुम्ही तुमचे निर्णय घेऊन त्या काळात कसे सामोरे जाता?
महाभारतावरून एक संदेश दिला जातो कायम मैत्री बद्दल की मैत्री ही धर्म पळून केली पहिजे नाहीतर तुम्ही कसाब चे दोस्त आहे म्हणून त्याला फाशी झाली तर तुम्ही कितीही धार्मिक असाल तरी तुमचा महाभारतातील karn झाल्याशिवाय राहणार नाही•
अमृत मिळवायची यात्रा आपण विष धारण केलेल्या व्यक्तीच्या खांद्यावर बसून करता काम नये•
उद्देश कितीही चांगला असला तरी त्याला मिळवायचा मार्ग अनुचित असता काम नये असेल तर आपल्या तथाकथीत मित्राला आपणच त्यातून बाहेर काढले पाहिजे •




Comments

  1. खूप वास्तववादी अणि सत्य कथन केल सर... खूप छान सर

    ReplyDelete
  2. Excellent ..very practical situation now a days.

    ReplyDelete
  3. A very realistic situation emerged 👌👌

    ReplyDelete
  4. खूप छान सर

    ReplyDelete
  5. Vastav cha bhan ...He pratyekala samajla pahije

    ReplyDelete
  6. This is what the truth Everyone should realise about our modern life.
    Very nice blog 👍

    ReplyDelete
  7. वास्तविकता दर्शनास आणून दिलीत . मस्त लेख😊👌👌

    ReplyDelete
  8. Abhyaspurvak lekha
    Satyata darshvnari paristiti var aprtim bhashya

    ReplyDelete
  9. वास्तव वादी लेखन साहेब खूप खूप छान👌👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  10. खुप छान सर,आणि अगदी खरं

    ReplyDelete
  11. पवार सर, एक अप्रतिम लेख पोस्ट केला आहे. आजच्या तरुणाईचं तंतोतंत , आभासी जग उत्कृष्ट रित्या प्रकट केले आहे. त्यांच्या डोळ्यात खरेखुरे अंजन घालणारी पोस्ट केली आहे
    धन्यवाद !!!!!!

    ReplyDelete

Post a Comment